Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खेकडा पकडून त्यावर गुन्हे दाखल करा अनोखे आंदोलन

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2019 (16:32 IST)
जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरणाच्या संदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अनोखे आंदोलन करत नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये चक्क खेकडे आणत आरोपी म्हणून खेकड्याना अटक करावी अशी मागणी केली. धरण खेकड्यांमुळे पडले असे विधान करणारे हे सरकार बेशरम आणि असंवेदनशील असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.  
 
जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांमुळे पडले असल्याचे विधान केले, खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण धोकादायक झाले होते. या विधानाचा आव्हाड यांनी समाचार घेतला असून कार्यकर्त्यांसमावेत नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये जात खेकडे आरोपी म्हणून हजर केले. मंत्री अशाप्रकारे विधान कसे काय करू शकतात असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. अनेक नागरिकांचा जीव गेल्यानंतरही अशी विधाने करून या सरकारने असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आव्हाड म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments