Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला कळत नाही संजय राऊतांचे आभार मानू की आश्चर्य व्यक्त करू’-किरीट सोमय्या

Webdunia
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:36 IST)
भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना  नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. तसेच हा घोटाळाही उघड करा असं देखील राऊत यांनी म्हटलं होतं. यावरुन भाजपचे  जेष्ट नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला, ED, CBI चौकशीसाठी किरीट सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन संजय राऊत  यांनी पत्राद्वारे केलं आहे. यावरून किरीट सोमय्या म्हणाले की, मला कळत नाहीये की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला. त्यांनी शरद पवार  आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचं आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टता करावीस असं सोमय्या  यांनी म्हटलं आहे.
 
पुढे सोमय्या  म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीचं प्रशासन आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं आहे.त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेसंबंधी चिंताही व्यक्त केली आहे. कारण एक परमबीर सिंगही ते शोधू शकले नाहीत.मी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की,त्यांनी आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. असं सो़मय्या म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments