Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्थानिकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही : संजय राउत

Webdunia
बुधवार, 30 मार्च 2022 (16:10 IST)
कोकणातील नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला हलवण्यात यावा अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रत्नागिरीतील स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. स्थानिकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही. राज्याच्या आणि देशाच्या विकासाला खिळ बसेल अशी भूमिका शिवसेनेची नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊतांनी नाणार रिफायनरीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्या प्रकल्पाला किंवा कोणत्या विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात ज्या भागात हा प्रकल्प होत आहे. तिकडची शेती, फळबागा, समुद्र, मच्छिमार समाज यांचा विरोध प्रकल्पाला आहे.

कारण या प्रकल्पामुळे त्यांच्या रोजीरोटी, शेती आणि फळबागा नष्ट होतील. यासाठी त्यांचे आंदोलन तेव्हासुद्धा सुरु होते आणि आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही. याचा अर्थ तो प्रकल्प होऊ नये असे नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: अकोला जिल्ह्यात गावकऱ्यांनी चार तरुणांना केली बेदम मारहाण

कमी शिजवलेले चिकन खाऊ नका ते धोकादायक आहे, अजित पवारांनी हा इशारा का दिला?

अपार्टमेंटमध्ये आढळले एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह

सातारा : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगचा केला अवलंब

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

पुढील लेख
Show comments