Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

“वसुलीसाठी पोलीस वापरता, मग…”; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Webdunia
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:00 IST)
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला दररोज वेगवेगळं वळण लागताना दिसत आहे. अनेक जणांचं नाव यासंदर्भात जोडलं जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दररोज नवनवे आरोप करत अनेकांवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटल्याचे राणेंनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
 
“ड्रग्ज या राज्यात यायला नको भावी पिढी उद्धवस्त होत आहे. त्यामुळे ड्रग्ज विरोधात कडक कारवाई करणे आणि ड्रग्ज सबंधित लोकांना तुरुंगात टाकण ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार हे करत नाही आहे. ड्रग्ज प्रकरणात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. पण ड्रग्ज बंद करण्यासाठी आम्ही मोहीम सुरु करु, असे मुख्यमंत्री का बोलत नाहीत. त्यांनी कणखरपणे बोलायला पाहिजे. पोलिसांना कामाला लावलं पाहिजे. पोलिसांना तुम्ही वसुलीसाठी वापरता, मग ड्रग्ज राज्यात येत आहे त्याला विरोध करायला का वापरत नाही?”, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
 
“करोना हाताळायला देखील राज्य सरकार कमी पडत आहे. राज्यात बेरोजगारी वाढली. त्यामुळे यावर उपाय केले पाहीजेत फक्त नरेंद्र मोदींवर टीका करुन नाही भागणार. ज्या प्रकारे नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. तुम्हाला साधी मुंबई महानगरपालिका देखील चालवता येत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हे सरकार काय करत आहे. सरकारमधले मंत्री फक्त लपाछपी खेळत आहेत”, असा निशाणा देखील नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर साधला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

IND vs BAN: T20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

सर्व पहा

नवीन

Kabir Jayanti 2024 : संत कबीर दास भक्ती काळाचे एकमेव कवी

डिपफेक व्हिडीओ पाहून केली गुंतवणूक, मुंबईतील डॉक्टरची सात लाखांना फसवणूक

महाराष्ट्रात पोलिसिंग अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करण्यासाठी AI चा वापर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Atal Setu: अटल सेतु मध्ये तडे, नाना पटोलेंनी महायुति सरकार वर लावले भ्रष्टाचाराचे आरोप

शिष्टमंडळाने ओबीसी कार्यकर्त्यांची भेट घेतली,उपोषण संपवण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments