Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (08:36 IST)
जगभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. चीनसह दक्षिण कोरिया, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झाले आहे. केंद्राकडून राज्यांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनेबाबत एक पत्र देखील पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासन देखील सतर्क झाले असून, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
दरम्यान, नाताळची सुट्टी व थर्टीफस्टमुळे रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रवासामध्ये तोंडाला मास्क लावावा, सुरक्षित अंतर ठेवावे, प्रवासामध्ये सॅनिटायजरचा वापर करावा, अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिल्या जात आहेत. थर्टीफस्ट आणि नाताळमुळे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांच्या प्रतिक्षा यादीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
 
प्रवासी सिझनमुळे सध्या मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. इतर गाड्यांना रेखील आरक्षणासाठी मोठी प्रतिक्षा यादी आहे. परिणामी अनेक जण वेटिंगचे तिकीट काढून खाली बसून प्रवास करणे पसंत करत आहेत. जनरल डब्यांमध्ये, तर पाय ठेवायला देखील जागा मिळत नाही. आरक्षितसह जनरल डब्यांमध्ये बहुतांश प्रवासी मास्क लावणे टाळतांना दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांनी मास्क वापरावे. प्रवासात सुरक्षित अंतराचे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत.

 

संबंधित माहिती

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments