Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोलीत दोन लहान मुलांचे मृतदेह रुग्णालयातून खांद्यावर घेऊन आई वडील चालत घरी पोहोचले

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:01 IST)
महाराष्ट्रातील गडचिरोलीत तापावर उपचारासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्याकडे दोन मुलांना नेले. काही तासांतच दोन्ही मुले मरण पावले.नंतर कुटुंबीय मुलांना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले.मुलांचे मृतदेह घरी आणताना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मुलांचे पालकांनी मृतदेह खांद्यावर घेत 15 किलोमीटर चालत घरी पोहोचले. हे प्रकरण बुधवारचे अहेरी तालुक्यातील पत्तीगावातील आहे. 
 
अहेरी गावातील रहिवासी वेलादी कुटुंबातील दोन मुलं आपल्या आई वडिलांसह दोन दिवसांपूर्वी पत्तीगावात आले होते. या मुलांना 4 सप्टेंबर रोजी ताप आला. आई वडील मुलांना घेऊन डॉक्टरकडे न जाता एका पुजाऱ्याकडे घेऊन गेले. त्याने मुलांना काही वनौषधी दिल्यावर त्यांची तब्बेत खालावली. सकाळी 10:30 वाजता एका मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा दुपारी 12च्या सुमारास झाला.नंतर त्यांना घेऊन पालक रुग्णालयात गेले. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने देचालीपेठातुन रुग्णवाहिका मागवण्यात आली असता पालकांनी ते घेण्यास नकार दिला आणि दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायीच 15 किलोमीटर चालत पत्तीगांव घराच्या दिशेने निघाले.  नंतर त्यांच्या नातेवाईकाची बाईक मागवली आणि घरी पोहोचले. 

जिमलगट्टा रुग्णालयापासून पत्तीगावात जाण्यासाठी पक्की सडक नाही त्यामुळे चिखल आणि मातीतून जावे लागते. म्हणून मुलांचे मृतदेह घेऊन आई वडील पायीच निघाले.या प्रकरणाचा तपास पोलीस लावत आहे.
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments