Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवघ्या २० मिनिटातच किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीतून पडले बाहेर

Webdunia
शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (16:02 IST)
मुंबईहून निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायतीत पोहोचले. त्यानंतर ग्रामपंचायतीत माहिती घेण्यासाठी ते कार्यालयात गेले. पण त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही कार्यालयात गेल्याने शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. किरीट सोमय्यांसोबत कार्यकर्ते असल्यामुळे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणता घोषणाबाजी केली. पण शिवसैनिकांनी आक्षेप घेतल्यानेच ग्रामपंचायत कार्यालयातून भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढले. अवघ्या २० मिनिटातच किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीतून बाहेर पडले. 
 
किरीट सोमय्यांनी १८ बंगले गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीकडून माहिती घेण्यासाठी हा दौरा केला. याआधी संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले कुठे आहेत ? असे आव्हान पत्रकार परिषद घेऊन दिले होते.
 
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यानेच किरीट सोमय्यांना आटोपते घ्यावे लागले. कोर्लई ग्रामपंचायतीच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून स्वच्छताही करण्यात आले. दोन्ही पक्षाचे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले कार्यकर्ते पाहता अलिबाग पोलिसांकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता पोलिसांनीच सोमय्यांना आटोपते घ्यायला सांगितले.
 
किरीट सोमय्या कोर्लई गावात दाखल होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. कार्यकर्त्यांना जाणून बुझून घेऊन किरीट सोमय्या आल्याचे आरोप शिवसैनिकांनी केला. याठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली. पण वाढती तणावाची परिस्थिती पाहता किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेतला.
 

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments