Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्योगमंत्र्यांचे कोकणातील लोक त्यांच्या उद्योगांबद्दल सांगतात - उदय सामंत

Webdunia
बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (07:49 IST)
विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपा यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे. नव्या सरकारच्या काळात एकही नवा उद्योग आला नाही, असा दावा ठाकरे गट, तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केला जातो. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात नवे उद्योग आणण्याचे काम केलेले नाही, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. दरम्यान, ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गुंतवणूक आणि नव्या उद्योगांच्या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते  मागाठाणे येथील एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
 
“पुढच्या पिढीला रोजगार हवा असेल, नोकरी हवी असेल तर नव्या उद्योगांची गरज आहे. मात्र मागील सात ते आठ महिन्यांत महाराष्ट्रात एकही उद्योग आलेला नाही. महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, तेव्हा साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. मात्र आताच्या उद्योगमंत्र्यांचे उद्योग त्यांनाही माहिती नाहीत. मात्र कोकणात जाऊन सभेत विचारलं तर कोकणातील लोक त्यांच्या उद्योगांबद्दल सांगतात,” अशी टीका अदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments