Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदारांना घरे देण्याचा निर्णय झालेलाच नाही

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (15:25 IST)
सर्व आमदारांना मुंबईत हक्काची घरं देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली होती. या निर्णयावरुन राजकारण तापले असतानाच आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारांना घरे देण्याचा निर्णय झालेलाच नाही, त्यामुळे त्याची अंमलबजावणीही होणार नसल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारने या निर्णयाविरोधात घुमजाव केले की, काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
 
अशोक चव्हाण यांनी आज सपत्नीक उस्मानाबादेत तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी माध्यमांनी त्यांना आमदारांच्या घरांसदर्भात प्रश्न विचारले असता चव्हाण म्हणाले, आमदारांना घरे देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात कोणत्याही आमदारांची मागणी नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधक विनाकारण या मुद्यावरुन राजकारण करत आहेत.
 
दरम्यान, आता अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या आमदारांच्या घरांच्या निर्णयावरून घुमजाव घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments