suvichar

औरंगाबाद निषेधार्ह; सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी - जयंत पाटील

Webdunia
सोमवार, 14 मे 2018 (14:42 IST)

काल रात्री    औरंगाबाद  येथे दोन गटांत किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान दंगलीत झाले. या घटनेचा निषेध करताना भाजप सरकारला महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आले आहे हेच यावरून दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष   जयंत पाटील   यांनी केली आहे.

क्षुल्लक कारणावरून दोन समाजांत तेढ निर्माण होऊन त्याचे दंगलीत रूपांतर होत असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत रात्रभर पोलिस काय करत होते आणि पर्यायाने गृहखाते काय करत होते, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

सत्तारूढ पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यांनी फिरून एका गटाची बाजू घेत भांडण मिटवण्याऐवजी आणखी वाद वाढवत आहेत. तणाव निर्माण व्हावा अशी या सरकारची मानसिकता का, असेही ते म्हणाले. दंगल सरकार थांबवू शकले नाही, पण आता या घटनेतील आरोपींना पकडण्याचे काम तरी सरकारने करावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

प्रत्येक बैठकीला राजकीय वळण देऊ नका, उद्धव ठाकरेंच्या नाराजीवर राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण

LIVE: मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

ठाणे : ऑनलाइन वधूने विवाह वेबसाइटवर प्रेमाच्या नावाखाली तरुणाला लाखो रुपयाला फसवले

महाराष्ट्रात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' सुरू, महसूल आणि जमिनीचे प्रश्न क्षणार्धात सोडवता येतील

Women's Asia Cup Rising Stars भारताने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला

पुढील लेख
Show comments