Marathi Biodata Maker

स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारकडून –जयंत पाटील

Webdunia
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (09:37 IST)
दोन कोटी रोजगारांचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारनेच केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाच वर्षांत देशात असहिष्णुता, जातीय तणावाच्या वातावरणामुळे गुंतवणूकीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याचेही पाटील म्हणाले. राम मंदिरासारख्या विषयाचे हे सरकार भांडवल करू पाहाते आहे, पण देशातील प्रत्येक माणसाला रोजगाराची चिंता अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या कथनी आणि करनीतले अंतर जनतेला समजले आहे. त्यामुळे आता जनता परिवर्तनासाठी निवडणुकीची वाट बघते आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मागणारे सरकार जनतेला काय देणार? माजी अर्थमंत्री  - जयंत पाटील यांचा सवाल..
 
भाजपा सरकारने काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडे कर्ज मागितले होते. असे कर्ज मागणारे नरेंद्र मोदी यांचे सरकार जनतेला काय देणार, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले, तरी त्याचा फायदा हा काही कोटी लोकांनाच होणार आहे, याकडे लक्ष वेधताना मोदी सरकारने केलेल्या घोषणा अर्धवट असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. देशाची सत्ता टिकवण्यासाठी मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मनीषा हवालदारला पुण्यात अटक केली

एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात अनेकांचा मृत्यू

येथे पेट्रोल आणि डिझेल ६ रुपयांनी स्वस्त; सरकारने केली घोषणा

१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मराठी शिकणे अनिवार्य असेल, राज्य सरकारचा अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा

पुढील लेख
Show comments