rashifal-2026

स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारकडून –जयंत पाटील

Webdunia
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (09:37 IST)
दोन कोटी रोजगारांचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारनेच केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाच वर्षांत देशात असहिष्णुता, जातीय तणावाच्या वातावरणामुळे गुंतवणूकीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याचेही पाटील म्हणाले. राम मंदिरासारख्या विषयाचे हे सरकार भांडवल करू पाहाते आहे, पण देशातील प्रत्येक माणसाला रोजगाराची चिंता अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या कथनी आणि करनीतले अंतर जनतेला समजले आहे. त्यामुळे आता जनता परिवर्तनासाठी निवडणुकीची वाट बघते आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मागणारे सरकार जनतेला काय देणार? माजी अर्थमंत्री  - जयंत पाटील यांचा सवाल..
 
भाजपा सरकारने काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडे कर्ज मागितले होते. असे कर्ज मागणारे नरेंद्र मोदी यांचे सरकार जनतेला काय देणार, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले, तरी त्याचा फायदा हा काही कोटी लोकांनाच होणार आहे, याकडे लक्ष वेधताना मोदी सरकारने केलेल्या घोषणा अर्धवट असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. देशाची सत्ता टिकवण्यासाठी मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्याची शेवटची संधी!

मुंबईत मासे खाल्ल्याचा संशयावरून मित्राचा मारहाणीत मृत्यू

इंदूरमध्ये कार चार्जिंग दरम्यान झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील ७ सदस्य जिवंत जळाले

इस्रायली हल्ल्यात अली लारीजानी आणि त्यांचा मुलगा ठार, इराणने पुष्टी केली

LIVE: ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाला आनंद दिघे यांचे नाव देण्यात येईल

पुढील लेख
Show comments