suvichar

म प्र प्रमाणेच राज्य शासनानेही येथील शेतक-यांना दर फरकातील भरपाई द्यावी.

Webdunia
रविवार, 3 सप्टेंबर 2017 (17:03 IST)
शेतीमालास निश्चित दर मिळावे म्हणुन मध्यप्रदेश सरकारने तेथील शेतक-यांना सोयाबीन, भुईमुग, तीळ, रामतीळ, मका, मुग, उडीद व तुर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभुत किंमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही राज्यातील शेतक-यांना दर फरकातील भरपाई द्यावी अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली.लासलगाव ही देशातील आणि एशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.

मध्यप्रदेशात गेल्या काही महिन्यांपुर्वी शेतकरी आत्महत्या आणि घसरलेल्या दरांमुळे मोठे शेतकरी आंदोलन झाले होते. त्या पार्श्वभुमीवर शेतक-यांना रास्त दर मिळावेत म्हणुन नुकतीच मध्यप्रदेश राज्य मंत्रीमंडळाने सदर आठ शेतीमालाची किमान आधारभुत किंमत व बाजारातील सर्वसाधारण भाव यातील फरकाची रक्कम शेतक-यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

होळीच्या दिवशी १,२४४ विशेष गाड्या चालवल्या जातील, रेल्वे मंत्रालयाची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : पैठण तहसीलमधील कालव्यात झालेल्या कार अपघातात तीन जणांचे मृतदेह सापडले

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तेल कंपन्यांना डिझेल निविदेत हस्तक्षेप करू नये असा इशारा दिला

एसटीची शिवशाही बस बंद होणार; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments