Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जितेंद्र आव्हाड यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत अजित पवारांना टोला

Webdunia
बुधवार, 12 जुलै 2023 (21:28 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत अजित पवारांना टोला लगावला.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. दिल्लीत त्यांना ५ हजारांची मनसबदारी दिली, तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे.”
 
“एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा, लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे,” असं म्हणत त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.
“सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय”
 
सोशल मीडियावर लिहिणाऱ्या तरुणांवर होणाऱ्या कारवाईवर जितेंद्र आव्हाड “सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना उचलून नेलं जात आहे. हे तरुण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून व्यक्त होतात. ते कुणाला आई-बहिणीवरून शिव्या देत नाहीत.”


Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

...तर Pok चे भारतात विलीनीकरण शक्य झाले असते, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मोठे वक्तव्य

आर्वीमध्ये हरणाची शिकार करणाऱ्या 3 जणांना अटक, वनविभाग ने मांस विक्री करतांना पकडले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा भारत आणि पाश्चात्य देशांसाठी का आहे महत्त्वाचा?

शाळेमध्ये 10वी क्लासच्या विद्यार्थ्यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू

Pune अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले

सर्व पहा

नवीन

विक्ट्री परेडचा असली हिरो मुंबई पोलीस शिपाई, गर्दीमध्ये असे वाचवले महिलेचे प्राण

महाराष्ट्र : मुसळधार पावसानंतर ठाणे-पालघर मध्ये पूर परिस्थिती, NDRF ने 65 लोकांना वाचवले

मुंबई हिट अँड रन केस वर्ली प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोन जणांना अटक

‘खासगी कॉलेजात सव्वा कोटी रुपये मागितले,’ भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी परदेशात का जातात?

मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळा -कॉलेजांना सुट्टी जाहीर

पुढील लेख
Show comments