Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावण्याचा या सरकारचा हेतू - जितेंद्र आव्हाड

Webdunia
मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावण्याचा या सरकारचा हेतू आहे, असा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मुळात ज्या समाजांना आरक्षण आहे, त्यांना तरी ते मिळतंय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजाने खुल्या वर्गात जायचंच नाही असा अलिखित नियम या सरकारने केला आहे. 
 
खुला वर्ग म्हणजे समाजातील सर्व घटकांना खुला असलेला वर्ग..लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्रात ५४ टक्के ओबीसी आहेत आणि २५ टक्के एससी, एसटी आहेत. ७५ टक्के लोकसंख्या असलेल्यांना ५० टक्क्यांमध्ये कोंबण्याचं काम जर हे सरकार करणार असेल तर हा अन्याय आहे जो सरकार एमपीएससीच्या माध्यमातून करत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. ओबीसी असणाऱ्यांना खुल्या वर्गातून अर्ज करता येणार नाही असा नियम एमपीएससीतून करण्यात आला आहे. एकंदरीतच आरक्षणाबद्दल संशयास्पद भूमिका घेणारे हे सरकार मराठा आणि ओबीसींचं भांडण लावत शेवटी आरक्षणालाच मूठमाती देणार हे स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments