Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावण्याचा या सरकारचा हेतू - जितेंद्र आव्हाड

maratha
Webdunia
मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावण्याचा या सरकारचा हेतू आहे, असा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मुळात ज्या समाजांना आरक्षण आहे, त्यांना तरी ते मिळतंय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजाने खुल्या वर्गात जायचंच नाही असा अलिखित नियम या सरकारने केला आहे. 
 
खुला वर्ग म्हणजे समाजातील सर्व घटकांना खुला असलेला वर्ग..लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्रात ५४ टक्के ओबीसी आहेत आणि २५ टक्के एससी, एसटी आहेत. ७५ टक्के लोकसंख्या असलेल्यांना ५० टक्क्यांमध्ये कोंबण्याचं काम जर हे सरकार करणार असेल तर हा अन्याय आहे जो सरकार एमपीएससीच्या माध्यमातून करत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. ओबीसी असणाऱ्यांना खुल्या वर्गातून अर्ज करता येणार नाही असा नियम एमपीएससीतून करण्यात आला आहे. एकंदरीतच आरक्षणाबद्दल संशयास्पद भूमिका घेणारे हे सरकार मराठा आणि ओबीसींचं भांडण लावत शेवटी आरक्षणालाच मूठमाती देणार हे स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

ठाणे: वर्क फ्रॉम होम बहाण्याने महिलेची १५ लाख रुपयांना फसवणूक

LIVE: पुणे जिल्ह्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बालकांचे मृतदेह आढळले

कुणाल कामरालाही मर्यादेत राहण्याची गरज आहे एकनाथ खडसे यांचे विधान

हम होंगे कंगाल एक दिन...', कुणाल कामराने द हॅबिटॅटमधील तोडफोडीचा निषेध करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला

नितीन गडकरी यांचा दावा- 'भारताचे रस्ते नेटवर्क अमेरिकेपेक्षा चांगले असेल'

पुढील लेख
Show comments