Festival Posters

क कायद्याचा, झाला आता सोपा, कसा ते वाचा

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (20:55 IST)
गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी धर्मवीर न्यायज्योत नावाने संस्था सुरु केली आहे. येथे एक वकील असेल. हा वकील गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला देईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. ठाणे येथे ही संस्था सुरु करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले.  आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, लहान मुलांच्या हदयावरील शस्त्रक्रिया, अपंगांना व्हिलचेअर वाटप, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोपरी पुलाचे काम सहा महिने आधीच पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
 
वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांचे समर्थक आमदार व भाजपने शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आज त्यांना मी काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कधी कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत खंजीर खुपसले, पाठीत वार केले असतील तर आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही, नेहमी आमच्या शुभेच्छाा सर्वांसोबत असतात.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

कफ सिरपमुळे किडनी निकामी; नागपूर एम्समध्ये चार वर्षीय मुलाचा मृत्यू

शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक उसळी

LIVE: अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळींना पूर्णविराम दिला

'बेकायदेशीर बांगलादेशींना बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे,'-संघाचे प्रमुख मोहन भागवत

T20 World Cup भारत आणि इटलीने सराव सामने जिंकले, पहिल्याच दिवशी या संघांना पराभवाचा सामना करावा लागला

पुढील लेख
Show comments