suvichar

Kolhapur :राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू

Webdunia
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (21:11 IST)
Kolhapur : सध्या पावसाचा जोर कमी असल्याने पंचगंगा नदी पातळीत घट झाली असून, गेली 24 दिवस पाण्याखाली असलेल्या राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली.
 
कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा राजाराम बंधारा हा निगवे,वडणगे, चिखली,आंबेवाडी येथील नागरिक तसेच शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांसाठी जवळचा मार्ग समजला जातो. पंचगंगेला आलेल्या पूर परिस्थितीमुळे गेली 24 दिवस हा बंधारा पाण्याखाली होता.त्यामुळे वडणगे,निगवे,आंबेवाडी,चिखली येथील कामगारांना शिरोली एमआयडीसी कडे जाण्यासाठी शिवाजी पुलाचा वापर करून अवघे दहा किलोमीटरचे जास्तीचे अंतर लागत होते.
 
दरम्यान, गेली काही दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदी पातळीत घट होऊन राजाराम बंधाऱ्यावरील पुराचे पाणी ओसरले आहे. पुराच्या पाण्यातून वाहून आलेली लाकडे,झुडपे काढण्याचे काम महापालिका कर्मचाऱ्यांकडून पूर्ण झाले असून, बंधाऱ्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात अनेकांचा मृत्यू

येथे पेट्रोल आणि डिझेल ६ रुपयांनी स्वस्त; सरकारने केली घोषणा

१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मराठी शिकणे अनिवार्य असेल, राज्य सरकारचा अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! मुंबईतील प्रसिद्ध 'एअर इंडिया' इमारत १६०० कोटींना विकत घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज शिर्डी दौरा; रेल्वे प्रवासाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पुढील लेख
Show comments