Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हद्दच ! थेट स्मशानभूमिमध्ये दारूविक्री…

Liquor sales
Webdunia
शनिवार, 17 एप्रिल 2021 (15:59 IST)
अहमदनगरच्या अकोले तालुक्यात कोव्हीड परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास संचारबंदी सुरू आहे. या काळात अकोल्यातील सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना विक्रेत्यांकडून स्मशानभूमितही अनधिकृतपणे दारू विकण्यात येत असल्याचे संतापजनक प्रकार समोर येत आहेत.
 
जादाभावाने चोरीछुपी मार्गाने दारूची विक्री सुरूच असल्याबची तक्रार अकोल्यातील शिक्षण तज्ञ व दारूबंदी अंदोलनाचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी पोलिस निरीक्षक व दारूबंदी अधिकाऱ्यांकडे केली.
 
तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई संदर्भात सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे कायदेशीर दारू दुकानातून दारूचे खोकेच्या खोके दुकानाबहेर काढून विकण्याचे काम सुरूच असल्याबद्दलची तक्रार हेरंब कुलकर्णी यांच्याकडून होत आहे.यासंदर्भात हेरंब कुलकर्णी म्हणाले, सरकारच्या आदेशानुसार सध्या कोविड परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी संचारबंदीत दारूची दुकाने बंद ठेवली आहेत. स्मशानभूमीतही दारू विक्री सुरू केली.
 
अकोल्यातील स्मशानभूमी ते उदासी आश्रम या परिसरात शेतात दारूचे खोके ठेऊन खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक मद्यपी तिथे गर्दी करत आहेत, अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. तेथे गांजा विक्रीही सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्या कोणत्या दुकानाच्या स्टॉकमधील आहेत याची तपासणी करून संबंधित करून परवाना रद्द करावा. यापैकीच दुकानातून अगस्ती चित्रपटगृह परिसरातही एका घरातून विक्री होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाणे : महिलेवर लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याप्रकरणी तरुणाला अटक

ठाण्यातील प्लायवूड गोदामाला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी

मुलं लंडनला गेली आणि ड्रग्ज तस्कर बनली, नवी मुंबईतील श्रीमंत बिल्डर वडिलांची आत्महत्या

पाणीटंचाई दूर होईल,पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले कडक निर्देश

काटोल आणि नरखेड गावांचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल बावनकुळे म्हणाले

पुढील लेख
Show comments