Dharma Sangrah

परप्रांतीय मजूरांना मुख्यमंत्र्याचे आवाहन, लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही

Webdunia
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (21:54 IST)
लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही. परप्रांतीय कामगारांनी, मजुरांनी गावी जाण्याची घाई करु नये. अजिबात घाबरण्याचे काम नाही, राज्य सरकार तुमची संपूर्ण व्यवस्था करत आहे आणि पुढेही करेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परप्रांतीय मजुरांना दिलासा दिला. 
 
आज वांद्रे स्टेशनवर मजुरांचा जमाव झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मजुरांनी गावी जाण्यासाठी गाडी सुरु करण्याची मागणी केली होती. ही घटना दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
ठाकरे सरकारनी यावर आपली स्पष्ट भूमिका हिंदी भाषेत मांडत म्हटले की काळजी का करत आहात, तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
या दरम्यान त्यांनी हे देखील म्हटले की अशा संकटाच्या काळात कोणीही राजकारण करणार असेल तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

पुढील लेख
Show comments