Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुन्हा पाऊस

Webdunia
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (16:12 IST)
राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. यात पुढील दोन-तीन दिवसात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र,आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे येत्या ३ ते ४ दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने दिली आहे. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

यात नाशिक, पुणे,सातारा,औरंगाबाद,यवतमाळ,कोल्हापूर,जालन्यात पुढील तीन दिवसांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.राज्याच्या किनार पट्टीच्या भागात ढगांची दाटी दिसत पावसासाठी चांगले चिन्ह दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात, खास करून मराठवाडा व बाजूच्या परिसरात माध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी IMD कडे आली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments