Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Election Results 2021 Live: महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकाल आज, 15 तारखेला झाले होते मतदान

Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2021 (08:54 IST)
महाराष्ट्र पंचायत निवडणुकीचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील 12,711  ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान झाले. मतमोजणीपूर्वी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी सकाळी 9.30 वाजता सुरू होईल तर दुपारी अडीच वाजता निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी ही माहिती देताना सांगितले होते की महाराष्ट्रात 15  जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 79 टक्के मतदान झाले होते. राज्यात सुमारे 20 हजार पंचायत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
 
त्यांच्या मागण्यांसह 14 गावांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. हे लोक आपल्या भागाला नवी मुंबई महानगरपालिकेचा भाग बनवण्याची मागणी करत आहेत. जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी मतदान झाले नाही. या अधिकार्‍याने सांगितले की, गेल्या 15  वर्षांपासून या गावातील रहिवासी आंदोलन करीत आहेत आणि गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्येही मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
 
ठाकरे सरकारची परीक्षा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 15  महिन्यांपूर्वी सत्ता घेतल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-महायुती सरकारसमोर हे पहिले मोठे निवडणूक आव्हान आहे.सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि स्थानिक पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्षही या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात होते.
 
गेल्या वर्षी निवडणुका होणार होत्या 
मागील वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत राज्यातील 1,566 ग्रामपंचायतींमध्ये 31 मार्च 2020 रोजी निवडणुका होणार होत्या, परंतु कोरोनामुळे निवडणुकीचे वेळापत्रक 17 मार्च 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावर स्वार झालेल्या वराचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

महाकुंभमेळ्यावरून परतताना पिकअप ट्रक आणि कंटेनरची धडक चालकाचा मृत्यू

LIVE: किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर लव्ह जिहाद कायद्यावर हल्लाबोल

संजय राऊत हिरवा झगा घालून फिरतात, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर लव्ह जिहाद कायद्यावर हल्लाबोल

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होणार

पुढील लेख
Show comments