Marathi Biodata Maker

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

Webdunia
आथिक राजधानी मुंबई सोबतच इतर ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी पाणी साचले  आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे की  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र   वाढले असून,  अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढला आहे, त्यामुळे मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर वाढला आहे असे  हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दाब पुढील २-३ दिवस कायम राहणार असून, मुंबईतील कल्याण, वसई, विरार, नवी मुंबई, पालघऱ जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अजूनही हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. 
 
पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. मागील २४ तासात कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून महाराष्ट्र आणि वदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. याचा फायदा जायकवाडी धरणाला होणार होणार आहे.  महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.  ३ ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणात बुधवापर्यंत (३१ जुलै) मुसळधार पाऊस होणार असे वेधशाळेने वर्तवली आहे. पुणे आणि परिसरात महिनाअखेरीपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments