Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेरोजगारीमुळे तरूणांची लग्ने ठरत नाहीत- शरद पवार

Webdunia
शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (08:03 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेरोजगारीवरून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारवर हल्लाबोल करत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. रोजगाराच्या संधींचा तुटवडा असल्य़ाने लग्नासाठी योग्य तरुणांना वधू मिळत नसल्याने सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. असे विधान केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या ‘जनजागर यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवताना त्यांनी पुण्यात सरकार वर टिका केली.
आपल्या भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की ग्रामिण भागात बेरोजगारीची झळ सगळ्यात जास्त बसत आहे. बेरोजगारी मुळे लग्नायोग्य तरूणांची लग्ने ठरत नाहीत. त्यांच्याकडे नोकऱ्या नसल्यामुळे त्यांना कोणी वधू देण्यास तयार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशा तक्रारी अधिक प्रमाणात आढळतात.
भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार वर टिका करताना ते म्हणाले, “दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी काही समस्या तयार केल्या जात आहेत. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नसल्याने ते असे करत आहेत.” असे पवार म्हणाले, नोकरीच्या संधी वाढवणारी धोरणे स्वीकारण्याऐवजी समाजात फूट पाडण्याचे काम भाजप करत असल्याचे सांगून त्यांनी टीकास्त्र सोडले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments