Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार पुन्हा आमच्याकडे येतील, काही जण आमच्या संपर्कातही: संजय राऊत

Webdunia
गुरूवार, 28 जुलै 2022 (14:32 IST)
दहाव्या सुचीनुसार 16 बंडखोर आमदार अपात्र ठरणार कारण संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
 
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, संविधानाची सीमा ओलांडून न्यायमूर्ती निर्णय देणार नाहीत, असा विश्वास वाटतो. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतील अथवा फुटीर गटाला इतर पक्षात सामिल व्हावे लागेल. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याबाबत अनेक आमदारांची तयारी नाही. त्यामुळे काही आमदार पुन्हा आमच्याकडे येतील. काही जण आमच्या संपर्कातही आहेत.
 
10 व्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे जर उद्या सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंवर बोलताना ते म्हणाले, शिंदे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणवून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत कधी जावे लागले नाही. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईत आहेत, त्यामुळे सगळय़ा चर्चा या मुंबईतच होत होत्या

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments