Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेला त्यांच्या जाण्याने काही मोठे खिंडार पडले नाही; वसंत मोरेंचा रुपाली पाटीलांवर घणाघात

Webdunia
गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (12:19 IST)
रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
 
पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजत आहे. त्यातच आता पुणे महानगरपालिकेत मनसेचे नगरसेवक असणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी रुपाली पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
 
पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हंटले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांच्या जाण्यानं काही मोठे खिंडार पडले नसल्याचे वसंत मोरे यांनी म्हंटले आहे.
तसेच पक्षात कोण रिकामटेकड आहे हे त्यांनी सिद्ध करावे असे आव्हानही त्यांनी केले आहे. वसंत मोरे यांनी सांगितले की, रुपाली पाटील यांना राजीनामा द्यायचाच होता.
 
हा त्यांचा सगळं प्री प्लॅन आहे. तुम्हाला येत्या पुणे महानगरपालिकेत मनसेची ताकत दिसेलच. राहिला प्रश्न अंतर्गत वादाचा तर हा विषय मी स्वतः राज ठाकरे (Raj Thakare) आणि शर्मिला वहिनींसमोर मिटवला होता.
असे नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले. या सर्व घडामोडीनंतर नगरसेवक वसंत मोरे यांचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चाललेच व्हायरल होत आहे.
 
मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचा स्वतःचा आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांचा फोटो ट्विट करत कॅप्शन दिले आहे. जब हम दो साथ खडे तो सबसे बडे, अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असे कॅप्शन दिले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments