Dharma Sangrah

खासदार संजय राऊत यांनी या एक्झिट पोलच्या आकडेवारीला बघून मोदींना टोला लगावला म्हणाले-

Webdunia
रविवार, 2 जून 2024 (14:16 IST)
लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली. 
सर्व विरोधी पक्ष नेते एक्झिट पोलबाबत वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्याच क्रमाने संजय राऊत यांनीही एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. एक्झिट पोलबाबत ते म्हणाले की, हे आकडे त्या कॅमेऱ्यांमधून आलेले आकडे आहेत जे आमचे पंतप्रधान 12 कॅमेरे लावून साधना तपश्चर्या करत होते.

ते म्हणाले की, हे एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल हा कॉर्पोरेट्सचा खेळ आहे. पैसे फेकून शो पहा. तुम्हाला हवा तो डेटा तुम्ही काढू शकता.
 
यंदा कोणत्याही परिस्थितीत भारत आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करणार आहे. भारत आघाडी सरकार स्थापन करेल.आमचा या आकड्यांवर विश्वास नसल्याचं ते म्हणाले. 
 
खासदार संजय राऊत म्हणाले की,एक्झिट पोलचे हे आकडे ठरवून दिले आहे. राजस्थान मध्ये तर एकूणच 26 जागा असून तिथे एका कंपनीने भाजपला 33 जागा मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मोदींनी एवढी ध्यानधारणा केली त्यावरून असे वाटत होते की एक्झिट पोल मध्ये त्यांना 800 ते 900 जागा मिळतील. 350 ते 370 तर काहीच नाही. ध्यानधारणा करणाऱ्यांना तर 800 जागा मिळायला पाहिजे. अशी टीका संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली. 

यंदा देशात इंडिया आघडीचं सरकार येणार आहे. इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील. आम्ही लोकांमधून कौल घेतला आहे. यंदा महाराष्ट्रात काय होणार, देशात काय होणार आहे हे आम्हाला माहित आहे. एक्झिट पोलचे आकडे काहीही सांगूदे मात्र यंदा देशात इंडिया आघाडीची सरकारच येणार.असे ते म्हणाले. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments