Dharma Sangrah

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांची अजित पवारांवर टीका

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2023 (08:10 IST)
MP Sanjay Raut criticizes Ajit Pawar  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.  यावर आता राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले.
 
'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...
 
राऊत हे फक्त बोलबच्चन आहेत. महाविकास आघाडीचे सरकार संजय राऊतांमुळेच पडले
राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, अजित पवारांची अक्कल काढणाऱ्या संजय राऊतांनी अगोदर मेंदू तपासून घेतला पाहिजे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना फुटली. त्यांनी उद्धव ठाकरेंचं साम्राज्य उद्धस्त केलं, असा आरोपही पाटील यांनी राऊतांवर केले.
 
'संजय राऊत हे फक्त बोलबच्चन आहेत. महाविकास आघाडीचे सरकार संजय राऊतांमुळेच पडले, अजित पवारांना अक्कल शिकवणारा हे संजय राऊत एका निवडणुकीत जनतेतून आलेले नाहीत. अजितदादा विधानसेभेत देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून आले आहेत, संजय राऊत यांना फक्त वर्तमानपत्रात लिहिण्याची अक्कल आहे. राऊतांनी शिवसेना फोडली, यांच्या तोंडाला चाप लावण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी केली.    
 
'राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्याइतपत अजित पवार यांना अक्कल नाही. त्यांना दिल्लीतून आदेश आहेत. त्याप्रमाणे त्यांनी पक्षावर दावा केला, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. पण या संकटकाळात शरद पवार एकटे नाहीत. शिवसेना त्यांच्या साथीला आहे, असं सांगतानाच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडून कुणाला जर मास्टरस्ट्रोक मारला असं वाटत असेल तर २०२४ ला आमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा येऊ द्यात, असे मास्टरस्ट्रोक काय असतात हे दाखवून देतो,असंही राऊत म्हणाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: NCRB अहवाल २०२४: महाराष्ट्रात मुलांवरील अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात: ५० पैसे किलोपर्यंत भाव घसरले, १५०० रुपये अनुदानाची मागणी

भीमाशंकर मंदिराचे दरवाजे ३१ मे रोजी पुन्हा उघडणार; व्यवसायात वाढ अपेक्षित, तरीही हॉटेल मालक संकटात

फेक न्यूज पसरवणाऱ्यांना आता चाप! महाराष्ट्र सरकार आणतंय नवा कठोर कायदा

बंगालमध्ये 'कमळ' राज: ५ मंत्र्यांसह शुभेंदु अधिकारींनी घेतली शपथ, मोदींच्या रोड शोने दणाणली कोलकाता!

पुढील लेख
Show comments