Festival Posters

मुंबईला अतिदक्षेचा इशारा, रेल्वे सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Webdunia
आगामी तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा दिला. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, असे आदेश रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. 
 
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संघटनेने माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना बुधवारी दिल्या. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Flashback : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या अभिनेत्रींनी भारतीय कथांना एक नवीन परिमाण दिला

रोहित शर्माचे धमाकेदार पुनरागमन; ७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक

तैवानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप

२० वर्षांनंतर 'ठाकरे बंधू' पुन्हा एकत्र, उद्धव-राज यांची ऐतिहासिक हातमिळवणी; विरोधकांचे धाबे दणाणले

LIVE: मनसे आणि शिवसेना-यूबीटी युतीची औपचारिक घोषणा

पुढील लेख
Show comments