Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला अतिदक्षेचा इशारा, रेल्वे सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Webdunia
आगामी तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा दिला. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, असे आदेश रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. 
 
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संघटनेने माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना बुधवारी दिल्या. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

‘पालिका निवडणुकीनंतर ठाकरेंचा पक्ष दिसणार नाही’, संजय शिरसाट यांचा दावा

पुणे : मुलीने अवैध संबंध उघड केल्यावर आईने अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केला

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीने तुरुंगातच गळफास घेतला

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

LIVE: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

पुढील लेख
Show comments