Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई- पुणे- नाशिक सुवर्ण त्रिकोण पूर्ण करणार : मुख्यमंत्री

Webdunia
मुंबई, पुण्यासह नाशिकच्या विकासासाठी मुंबई- पुणे- नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचा आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीप्रसंगी ते बोलत होते.  
 
मुख्यमंत्री म्हणाले, मालेगांव तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. मालेगांवच्या सर्वांगिण विकासावर भर देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. येत्या काळात या संदर्भातील कार्यवाहीला गती देण्यात येईल. राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र कार्यवाही करण्यासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात येईल. नदीजोड प्रकल्प, पाणी आरक्षण प्रश्नांबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत लोकप्रतिनिधींमार्फत आलेल्या सुचनांचा निश्‍चितपणे विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments