Festival Posters

मुंबई विद्यापीठाचा ‘रखडलेला निकाल’ लवकर लावा

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (12:25 IST)

मुंबई प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी कुलगुरूंना निवेदन

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांची भेट घेऊन परीक्षा विभागाचा ‘रखडलेला निकाल’ या गंभीर विषयावर चर्चा केली आणि हे निकाल लवकर लागावेत अशा मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त केले.

आपल्या ७०व्या स्वातंत्र दिनीही मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी रखडलेल्या निकालाच्या कैदेतून मुक्त झाले नाही. राज्यपाल व उच्चशिक्षणमंत्री ह्यांनी जाहीर केलेल्या वाढीव तारखा संपल्या असूनही निकाल अद्याप हाती आलेले नाहीत. लाखो विद्यार्थी हवालदिल आहेत. हेच विद्यार्थी आपल्या देशाचे भवितव्य घडवणार आहेत. मात्र त्यांचेच भवितव्य धोक्यात आले आहे. निकालाच्या विलंबास मुंबई विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख जबाबदार आहेत.

विद्यार्थांना पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या दस्तावेजासाठी अक्षरश: परीक्षा भवनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. टी.वाय.बीएसी तसेच ३१ जुलैला लागलेले इतर निकाल संपूर्णपणे जाहीर झालेलेच नाही. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थाच्या देशांतर्गत आणि विदेशातील प्रवेशासाठी मदत करावी व त्यासाठी मदत कक्ष स्थापन करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुनर्मुल्यांकन आणि फोटो कॉपीसाठी वाढता विद्यार्थी टक्का लक्षात घेता ही सुविधा विद्यार्थांसाठी मोफत कराण्याचे या निवेदनात नमुद केले आहे. पाच दिवसात पुनर्मुल्यांकन आणि दोन दिवसात फोटोकॉपी देण्यात यावी जेणेकरून विद्यार्थांचे वर्ष वाया जाणार नाही आशीही मागणी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

BMC मध्ये भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे, संजय घाडी यांना उपमहापौरपदी उमेदवारी दिली

अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण! मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका करताना म्हटले-"राजकारण्यांनी त्यांची माणुसकी गमावू नये''

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; गडचिरोली जिल्हा 'भारताचा ग्रीन स्टील हब' म्हणून विकसित केला जाईल

LIVE: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान

ओला, उबर आणि रॅपिडो आज संपावर; केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लिहले पत्र

पुढील लेख
Show comments