Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा

Mumbaikars should use water sparingly
Webdunia
बुधवार, 20 मार्च 2024 (09:46 IST)
पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लॅडरमध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू झाली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटरपर्यंत खाली आणण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. त्यानंतर पालिकेकडून रबरी ब्लॅडर दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. या काळात भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले असले तरी बंधाऱ्याची पाणी पातळी पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे.
 
दरम्यान, पाणी कपाती दरम्यान मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
 
अचानक बिघाड झाल्याने पाणीगळती -
 
१)  अचानक बिघाड झाला. पाणी गळती झाली. पाणीपातळी ३१ मीटरपर्यंत आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
 
२) सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
 
३) पालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

हवामान बदलामुळे बाराबंकी आणि अयोध्येत 10 जणांचा मृत्यू, 10जण गंभीर जखमी

अविनाश साबळे हंगामातील पहिल्या डायमंड लीगमध्ये सहभागी होणार

RCB vs PBKS Playing 11: आरसीबी घरच्या मैदानावर पहिला विजय मिळविण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ठेवी आणि खात्यांबाबत आरबीआयने सूचना जारी केल्या

500 दिवसांनंतर गाझाहून रशियन बंधक घरी परतले, पुतिन यांनी भेट घेतली

पुढील लेख
Show comments