Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता अंशतः शिथिल

Webdunia
गुरूवार, 20 ऑक्टोबर 2016 (09:52 IST)
सहा नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकामुळे संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूकविरहित तालुक्यांतील विकासकामे ठप्प होणार आहेत. या पार्श्वशभूमीवर निवडणूक असलेल्या नगरपालिका हद्दीपुरतीच आचारसंहिता मर्यादित ठेवावी ही मागणी राज्य निवडणूक आयोगाने मान्य करत इतर भागातील आचारसंहिता अंशतः शिथिल करण्यास सहमती दर्शवली आहे.
 
राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे.एस.सहारिया यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांयशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सर्वच जिल्हाधिकार्यांयनी आचारसंहितेबाबत लोकप्रतिनिधींच्या नाराजीसंदर्भात आयोगाला कळवले. राज्य निवडणूक आयोगाने १९२ नगरपरिषदा आणि २० नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करत ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागू केल्याने विकासकामे थांबली आहे. निवडणूक पार्श्वाभूमीवर ज्या विषयांना मंजुरी देण्यात आली त्या कामांच्या निविदा काढता येणार नाहीत. तसेच प्राप्त झालेल्या कामाच्या निविदा उघडता येणार नाहीत. शिवाय ज्या कामांच्या निविदा उघडल्या आहेत त्या कामांच्या खर्चास अथवा करारनाम्यास समितीला मंजुरी देता येणार नाही.

आगामी २८ नोव्हेंबरपर्यंत आचारसंहिता असल्याने डिसेंबरमध्ये पदवीधर निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून महिनाभरात विकासकामे करणार कशी? जर विकासकामे होणार नसतील तर मतदारांना सामोरे जाणार कसे, असा प्रश्नत सदस्यांना पडले आहेत. 
 
व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्हाधिकार्यांदनी हा मुद्दा मांडला. मात्र यापूर्वीचा अनुभव विचारात घेता निवडणुका असलेल्या नगरपालिका हद्दीबाहेर कार्यक्रम घेतले जातात, ज्यामुळे मतदारांवर प्रभाव पडतो ही बाब विचारात घेऊन संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागू केल्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र ज्या भागात निवडणुका नाहीत तेथील विकासकामे करता येतील, असेही आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे याबाबतचा सुधारित आदेश काढून निवडणुका नसणार्याग जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व कामे नेहमीप्रमाणे सुरू ठेवता येतील. मात्र निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती करता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments