Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणे यांनी ती गोष्ट आत्मचरित्रात लिहायला नको होती

Webdunia
शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (10:34 IST)
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला आहे. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते, यावेळी काँग्रेसची निवड कशी केली आणि ती योग्य ठरली का, याबाबत पुस्तकात त्यांनी लिहायला नको होतं, असं शरद पवार  यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या झंझावात या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
 
जेव्हा राणे शिवसेनेतून बाहेर निघाले तेव्हा कोणत्या पक्षात त्यांनी जावे हा मोठा प्रश्न होता, तर काँग्रेसमध्ये जाऊ की राष्ट्रवादीमध्ये असे दोन पर्याय त्यांच्यासमोर आले. हे कोणाला माहित नाही. तेव्हा शेवटी राणे यांनी चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलली आणि ती काँग्रेसच्या नावाची निघाली तेव्हा  आता ही चूक होती की घोडचूक यावर मी काही बोलणार नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments