Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nashik Bus Accident update : नाशिक बस अपघातात आजी -नातीचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (19:00 IST)
नाशिकच्या औरंगाबाद मार्गावर मिरची हॉटेल जवळच्या चौकात पहाटे बसचा भीषण अपघात झाला त्यानंतर बसला आग लागली. या अपघातात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात 12 मृत्युमुखी झाले. या अपघातात अमरावतीहून शहापूरला कामासाठी निघालेल्या आजी आणि नातीचा मृत्यू झाला असून लक्ष्मीबाई मुधोळकर आणि कल्याणी मुधोळकर अशी त्यांची नावे आहेत. तर या अपघातात मृत्युमुखी झालेल्या पैकी चौघांची ओळख पटली आहे.

खरं तर प्रवाशी होरपळून गेल्याने त्यांची ओळख पटवणे हे मोठं आव्हान प्रशासनां समोर आले असून मृतांची ओळख पटविणासाठी मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून मयतांपैकी चार ची ओळख पातळी असून ते यवतमाळ, वाशीम बुलडाणाचे प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. अजय कुचनकुमार(16), रा. यवतमाळ, लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर(50)रा. लोणार बुलढाणा, कल्याणी आकाश मुधोळकर(3)रा.लोणार बुलढाणा, आणि उद्धव भिलंग (44)रा. मालेगाव वाशीम अशी मृतांची नावे आहे. 
 
या अपघातात मृत्युमुखी झालेल्या आणि जखमींना राज्य आणि केंद्र सरकार कडून मदत जाहीर करण्यात आली असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मयतांच्या वारसाला रुपये 2 लाख आणि जखमींना रुपये 50 हजारांची मदत करण्यात येईल. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातात मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांचा नातेवाईकांना रुपये 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींसाठी शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments