Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक: फायनान्स कंपनीच्या दोन वसुली एजंटवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2023 (08:19 IST)
एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी गेलेल्या दोघांवर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संशयित सुनील देशमुख (रा. दातीर मळा, अंबड) याने बजाज फायनान्स या कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्याचे कर्जाचे हप्ते थकल्याने वसुली एजंट गणेश बापूराव फाफळे (३४, रा.विडी कामगार नगर), किरण भास्कर फाफळे (४०, रा.गणेश चौक ) हे दोघे देशमुख अंबड औद्योगिक वसाहतीत काम करत असलेल्या कंपनीच्या बाहेर जाऊन त्यांनी देशमुख याला पैशाच्या मागणीसाठी बाहेर बोलाविले.

दरम्यान गणेश फाफळे यांनी त्याच्याकडे थकीत पैसाची मागणी केली असता देशमुख याने त्यांना शिवीगाळ करत बॉटलीमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ गणेश फापळे व त्यांच्या सोबत असलेले त्यांचा साथीदार किरण फाफळे यांच्या अंगावर टाकले यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
 
त्यांना पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

New Army Chief:जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

पासपोर्ट घोटाळा मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी सीबीआयची धाड, 32 जणांवर गुन्हा दाखल

सर्व पहा

नवीन

Bank Holidays in July 2024 :जुलै महिन्यात बँक एकूण 12 दिवस बंद असणार,सुट्ट्यांची यादी तपासा

1 जुलैपासून बदलणार नियम,खिशावर होणार थेट परिणाम

रोहितने वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानातून माती उचलून चाखली चव, व्हिडीओने मने जिंकली

दोन वर्षांची फसवणूक, राज्याला कर्जबाजारी केले', संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

पुढील लेख
Show comments