Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा; म्हणत नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Webdunia
रविवार, 15 मे 2022 (15:33 IST)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मुंबईत सभा झाली. त्या सभेवरून अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि त्याची समस्यां, लोड शेडींग आणि  वाढत्या बेरोजगारीवर काही ही बोलले नाही त्यांनी ती सभा फक्त इतर पक्षांवर टीका करण्यासाठी घेतली होती. लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा असं म्हणत नवनीत राणांनी उद्धव ठाकरे यांचा वर घणाघाती टीका केली आहे. त्या रविवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 
 
या परिषदेत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री गेले अडीच वर्ष कार्यालयात गेलेच नाही. तरीही मुख्यमंत्र्यानी राज्याचा दौरा केला. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कुठल्या भागाचा दौरा केला आणि शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवले. हे सांगावे. ठाकरे यांच्या काळात बेरोजगारी तिप्पटीने वाढली आहे. त्यांनी कित्येकांना रोजगार मिळवून दिले हे सांगावे. औरंगाबाद चे नाव बदल करण्याच्या मुद्द्यावर राणा म्हणाल्या की , औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करण्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आता तेच म्हणतात की औरंगाबादचे नाव बदल करण्याची काय गरज आहे. कारण नाव बदलले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस  आपली साथ सोडण्याची भीती त्यांना वाटत आहे. आणि सत्ता देखील जाऊ शकते. पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मधील कलम 370 रद्द करून दाखवले पण राज्याचे मुख्यमंत्री साधं एका शहराचं नाव बदलू शकत नाही. अशी घणाघात टीका राणा यांनी केली. महाराष्ट्रात सध्या अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवासात आहे. या असे महराष्ट्रात या पूर्वी कधीही घडले नव्हते. आता नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहावे लागणार.
 

संबंधित माहिती

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments