Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निसर्ग चक्रीवादळ : पडझड झालेल्या घरांना १५ हजारापासून दीड लाख लाखापर्यंत मदत

Webdunia
बुधवार, 10 जून 2020 (08:54 IST)
निसर्ग चक्रीवादळात पडझड झालेल्या घरांना १५ हजारापासून दीड लाख लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती आणि मदत व्यवस्थापनाच्या निकषांपेक्षा अधिकची मदत देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यानुसार पुर्णतः पडझड झालेल्या घरांना दीड लाख तर अंशतः पडझड झालेल्या घरांना १५ हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. याशिवाय वादळग्रस्तांना दोन महिन्यांचे अन्नधान्य दिले जाणार आहे. सोबतच निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वाढीव मदतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
 
गेल्या आठवडयात निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत रायगड जिल्ह्याचा दौरा करून रायगडसाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यानंतर रत्नागिरीला ७५ कोटी तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी रुपयांच्या तातडीची मदत जाहीर करण्यात आली होती. या  बैठकीत वादळानंतरच्या परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments