Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही; याचा निर्णय शिंदे आणि फडणवीस करतील- सुधीर मुनगंटीवार

Webdunia
शनिवार, 27 मे 2023 (08:21 IST)
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील जागावाटप 2019 प्रमाणेच असेल असा खुलासा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. शिवसेनेने गेल्यावेळी 48 पैकी 22 जागा लढवून 18 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 26 जागा लढवून 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळीही तशीच व्यवस्था असेल. तसेच २०२४ च्या निवडणुकीसाठी पक्षाने आधीच तयारी सुरू केली असल्याचा खुलासा खासदार गजानन कीर्तीकर यांनी केला आहे.
 
दरम्यान, किर्तीकरांनी अधोरेखित केलेल्या या मुद्द्यावर भाजपने अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असा कोणताही फॉर्म्युला तयार झाला नसल्याचे सांगताना, “एकनाथ शिंदे यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत, असे भाजपच्या एकाही नेत्याने म्हटलेले नाही. लोकांच्या हिताचे रक्षण करणारे सरकार देण्यासाठी शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यांच्या मागण्यांचा आदर केला जाईल. आधी बाळासाहेब ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील शिवसेनेचा भाजपने नेहमीच आदर केला आहे.” असे मंत्री मुनगंटीवार यांनी राजभवनात पत्रकारांना सांगितले.
 
शेवटी बोलताना ते म्हणाले “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकत्र बसून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय घेतील,” असेही ते म्हणाले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments