Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता शेतकऱ्यांना 1 रुपयांत रब्बी हंगाम बिमा मिळणार

Webdunia
रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (13:31 IST)
राज्य सरकार कडून खरीप हंगामासाठी 1 रुपयांत विमा योजना उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला आहे. आता 1 रुपयांत रब्बी हंगामात ही विमा  योजना सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुविधा सुरु केली. ही माहिती राज्य कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली. 
 
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसाद मिळाला आहे. या मुळे आता राज्य सरकार रब्बी हंगामात फक्त 1 रुपयांत विमा योजना देणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात सुमारे 7 लाख 45 हजार 316 शेतकऱ्यांनी 5 लाख 34 हजार 947 हेक्टर वरील पिकांचा विमा काढला होता. 2 हजार 32 कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित करण्यात आली. ही रब्बी पीक विमा योजना धुळे, पुणे हिंगोली, धाराशिव आणि अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इंश्युरंस कं.लि. मार्फत राबविण्यात येणार आहे. 
 
यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी दिवाळी गोड होणार आहे. येत्या आठवडाभरात जिल्ह्यात 53 हजार 951शेतकऱ्यांच्या खात्यावर 378 कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची रक्कम दर वर्षाला 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राज्य सरकारचे बँकांना शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज देण्याचे आवाहन

NEET Re-Test Result : NTA ने NEET री-टेस्टचा निकाल जाहीर केला

विजय वडेट्टीवार यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

LPG सिलिंडर झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

मुंबई रेल्वेचे स्टेशन आणि वेळ बदलली, या एक्सप्रेसमध्ये मिळणार फर्स्ट AC ची सेवा

सर्व पहा

नवीन

लोणावळ्यात भुशी डॅम धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

स्नेह राणाने एकाच डावात काढल्या 8 विकेट्स, गल्ली क्रिकेट ते टीम इंडिया; वाचा स्नेहचा प्रवास

अयोध्येच्या विकासासाठी कोट्यवधींचा खर्च, तरीही पहिल्याच पावसात दाणादाण - ग्राऊंड रिपोर्ट

डोळ्यांच्या कोरडेपणाकडे करू नका दुर्लक्ष, कोरडेपणा कमी करण्यासाठी 'हे' नक्की वाचा

अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं 'एआय वॉशिंग' म्हणजे काय आहे?

पुढील लेख
Show comments