Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Webdunia
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (15:43 IST)
कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस,आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू,असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.मलिक यांच्या या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून भाजपने मात्र मलिक यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
 
नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.काही आयपीएस,आयएएस अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.हे नियोजित कटकारस्थान आहे, त्यांच्या भेटी आम्ही वेळोवेळी उघड करू.केंद्रीय नेते आणि फडणवीसांना भेटून हे अधिकारी आरोप करतात, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
काही अधिकारी या सरकारवर आरोप करत आहेत. त्यांच्या फडणवीसांसोबत आरोप करण्यापूर्वी बैठका झाल्या आहेत. ठरवून कटकारस्थान केलं जात आहे.वेळ आली तर त्याची माहितीही देऊ.कोणते अधिकारी आणि विरोधी पक्षनेते आरोप करण्यापूर्वी कुठे भेटले आणि कसे भेटले याची माहिती देऊ,असं ते म्हणाले.फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतर आरोपांची मालिका सुरू झाली आहे,असा दावाही त्यांनी केला.देशातील संस्था आणि एजन्सी याचा राजकीय वापर होतो हे आता लपून राहिले नाही. ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर आता कोर्टानेही प्रश्नही उपस्थित केले आहेत.ते जेवढे हैराण करतील तेवढी जनता आमच्यासोबत राहील, असंही त्यांनी सांगितलं.
 
भाजपचे केंद्रातील सरकार जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे. तिथे त्या सरकारला बदनाम करण्यासाठी,त्या सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे.बंगालमध्ये तिच परिस्थिती करण्यात आली आहे.महाराष्ट्रात तसंच केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे.अनिल देशमुख,भावना गवळी, अनिल परब आणि संजय राऊत असतील या सर्वांना राजकीय हेतूने टार्गेट केलं जात आहे.कोणताही अधिकारी भ्रष्ट असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण सर्व विषय राजकीय हेतूने जोडण्यात येत आहे. हे सर्व कट कारस्थान भाजपने रचलं आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments