Marathi Biodata Maker

‘ओखी’ग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी : भास्कर जाधव

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (15:22 IST)

हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव  यांनी ओखी वादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि मच्छिमार बांधवांच्या व्यथा मांडल्या. तसेच त्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचेही मत व्यक्त केले.

जाधव म्हणाले की ओखी वादळामुळे कोकणातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण हे सरकार त्यांना मदत करण्याऐवजी उलटसुलट उत्तरे देत आहे आणि मूळ प्रश्न आणि मागणीला बगल देत आहे. ‘ओखीमुळे झालेल्या बोटीच्या नुकसानीला चार हजार रुपये मदत आणि फळपिकांना सहा ते सात हजार एकरी मदत देणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण ही मदत पुरेशी नाही. कोकणातील फळ पिकविम्यात बदल करावा, वाढती महागाई लक्षात घेता कोकणातील फळपिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख मदत देण्यात यावी. मच्छिमारांचे ‘एनसीडीसी’चे कर्ज माफ करावे आणि मच्छिमारी हा शेती व्यवसाय म्हणून जाहीर करावा, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालया कडून महाराष्ट्र सरकारला नोटीस

पूर्व नेपाळमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुढील लेख
Show comments