Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशातील सर्वात मोठी बाजरपेठ लासलगाव बाजार समिती अनिश्‍चित काळासाठी बंद

Webdunia
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (16:51 IST)
व्यापारी वर्गाकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी लहान स्वरूपातील चलन नसल्याने आशिया आणि देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिलेली आहे.
 
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांत १०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने उन्हाळ कांद्याची विक्री होत असून, हा कांदा एप्रिल व मेमध्ये साठवणूक केलेला आहे. त्यामुळे तो खराब होत असून, शेतकर्‍यांना हा कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच नवीन लाल कांदा बाजार आवारात येण्यास सुरुवात झाल्याने व तो टिकाऊ नसल्याने काढणीनंतर शेतकर्‍यांना हा कांदा लगेच विक्री करावा लागत आहे. मका, सोयाबीनची काढणी जोरात सुरू आहे. येत्या हंगामाची तयारी करण्यासाठी बी-बियाणो व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी, तसेच दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकर्‍यांना सध्या पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी हा शेतीमाल मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आणत आहे. अशा परिस्थितीत चलन तुटवड्यामुळे लिलाव बंद राहिल्यास येथील शेतकर्‍यांची माल विक्रीची गैरसोय होत आहे. चलन पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यामुळे शेतीमाल लिलावाबाबत अनिश्‍चितता निर्माण झालेली आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments