Festival Posters

या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट

Webdunia
शुक्रवार, 1 जुलै 2022 (10:11 IST)
मुंबईत पहिल्यांदाच मुसळधार म्हणावा, असा पाऊस (Rain)कोसळला. त्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाणी साचणे, लोकल ट्रेनचा खोळंबा, रस्त्यांना तलावाचे स्वरुप येणे, असे नित्याचे दृश्य पाहायला मिळाले. आज सकाळपासूनही मुंबईत पाऊस लागून राहिलेला आहे. त्यामुळे दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे पावसाचा सध्याचा रागरंग पाहता लोकल ट्रेन्सचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत तब्बल 163 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
 
आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवला, इराणने अमेरिका आणि इस्रायलला विनाशाचा इशारा दिला

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटी ही अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे, AAIB चा तपास अहवाल प्रसिद्ध

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार करत आहेत', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

पुढील लेख
Show comments