Dharma Sangrah

अहमदनगरमध्ये ऑनर किलिंग, मुलीची हत्या, जावयाला पेटवले

Webdunia
सोमवार, 6 मे 2019 (15:08 IST)
अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला. लग्नाला घराच्यांचा विरोध असताना लग्न करणार्‍या मुली आणि जावयला मुलीच्या काका आणि मामाने जाळण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर उपचार सुरु आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत. 
 
गंभीर भाजलेल्या मुलाचे नाव मंगेश रणसिंग असून त्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे होते. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या कुटुंबीयांना विवाह मान्य नव्हता आणि या कारणामुळेच त्यांनी दोघांना जाळण्याचा प्रयत्न केला.
 
घरगुती वादातून रुक्मिणी आपल्या माहेरी गेली होती. तिला भेटायला मंगेशही आपल्या सासरी पोहचला. नंतर मुलीचे वडील, काका आणि मामा यांनी त्याला बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार घल्यानंतर रुक्मिणीने पुन्हा पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही निघाले असात, कुटुंबीयांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि नंतर त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. गंभीर भाजल्याने रुक्मिणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

Veer Savarkar Punyatithi 2026 Messages in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

महाराष्ट्रात रस्ते सुरक्षा कडक होणार, मद्यपी चालकांवर कडक कारवाईचे निर्देश-प्रताप सरनाईक

T20 World Cup टी-२० विश्वचषकादरम्यान टीम इंडियाचा खेळाडू संघ सोडून गेला

सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली

गोव्यात भीषण रस्ता अपघात; पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या कारला एसयूव्हीची धडक

पुढील लेख
Show comments