Festival Posters

पालघर जिल्ह्यात पाणीबाणी, पिपांना कुलूप तर, पाणी माफियांचे वर्चस्व

Webdunia
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (17:32 IST)
आपल्या राज्यात सरकारने अखेर 180 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करत मदत सुरु केली, मात्र संपूर्ण महाराष्ट्रालाच तीव्रपाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे असे भयानक चित्र आहे. पालघर जिल्ह्यात तर अक्षरशः पाणीबाणी निर्माण झाली असून, सरकारी टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर उड्या टाकणाऱ्या नायगावातील चाळकऱ्यांनी चक्क पाणी भरून पिंपांना कुलूप ठोकले आहे. रहिवाशांच्या या अफलातून आयडियामुळे चाळीचाळींमध्ये पाणी ‘तिजोरी बंद’ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न किती भयानक आणि तीव्र आहे हे समोर येतंय. जून व जुलै महिना वगळल्यास पावसाने दडी मारली. केवळ 77 टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका अनेक शहरांनाही बसू लागला आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातीलही अनेक तालुक्यांमध्ये ठणठणाट आहे. त्यातच वसई-विरार पालिकेने अनेक चाळकऱ्याना अद्यापपर्यंत पाइपलाइनने पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे टँकरमाफियांचे चांगले दिवस आले असून पाण्यासाठी दर महिन्याला हजार ते दीड हजार रुपये खर्च करावे लागत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments