Dharma Sangrah

‘पंढरपूर’च्या मतदारांना राज्याच्या सर्व भागातून मतदानासाठी येण्यास परवानगी

Webdunia
शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:41 IST)
पंढरपूर मतदारसंघातील मतदार नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी राज्याच्या विविध भागात तसेच राज्याबाहेर राहत आहेत. त्यांना पंढरपूर पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्याच्या सर्व भागातून पंढरपूरला येण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 
त्यासाठी मतदार यादीत स्वतःचे नाव असल्याचा कोणताही पुरावा सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी सांगितले.
 
अप्पर सचिव घोलप यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान 17 एप्रिल 2021 रोजी होत आहे.
 
राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
 
13 एप्रिल 2021 च्या सरकारी आदेशानुसार 16 एप्रिल 2021 च्या संध्याकाळी सहापासून ते 18 एप्रिल 2021च्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कोणत्याही वाहनाने वैध ओळखपत्रधारक किंवा मतदारयादीत स्वतःचे नाव असल्याचा कोणताही पुरावा घेऊन प्रवास करणाऱ्यास प्रवास वैध समजून परवानगी द्यावी.
 
‘ब्रेक द चेन’ शीर्षासह 13 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या आदेशांमध्ये निर्देशित केलेल्या बंधनात राहून असा प्रवास करण्यास संबंधित मतदारांना परवानगी द्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments