Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकणातला बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरळीत

Webdunia
सोमवार, 26 जुलै 2021 (23:28 IST)
कोकण प्रादेशिक क्षेत्रातील महापुरामुळे खेड, चिपळूण, राजापूर तसेच संगमेश्वर तालुक्यातील वीज यंत्रणा पाण्यात बुडून आपत्कालीन परिस्थितीत वीज पुरवठा बंद केला होता. आता पूर ओसरताच महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेऊन बहुतांशी भागातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
 
कोकण प्रादेशिक क्षेत्रात येणाऱ्या खेड येथील 14, 8087, रत्नागिरी विभागातील 1, 15, 273 आणि चिपळूण विभागात 50, 977 अशी एकूण 3 लाख 14 हजार 337 वीज कनेक्शन बंद पडली होती, 24 तासांत यापैकी 2 लाख 87 हजार 737 वीज कनेक्शन सुरू करण्यात यश आले आहे.
 
महापुरामुळे चिपळूण येथे वीज पुरवठा करणार्‍या चार उपकेंद्रात पाणी भरले होते. यापैकी खेर्डी उपकेंद्र येथे 7 फूटपर्यंत पाणी साचल्यामुळे सर्व पॅनल, वीज यंत्रणा चिखल गाळाने भरून गेली होती. पुराची तीव्रता कमी होताच या चार पैकी एक उपकेंद्र सुरू करण्यात आले.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments