rashifal-2026

पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याची तयारी सुरु

Webdunia
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (16:40 IST)
राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. मार्च व एप्रिल असे दोन महिने शाळा घेवून विद्यार्थ्यांना मे महिन्यात सुटी देण्याचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून संपूर्ण शाळा ‘लॉकडाऊन’ झालेल्या होत्या. अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच नवीन वर्षात पहिल्या टप्प्यात इ.नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत यावे लागते. तसेच दररोज केवळ तीन तास शाळा भरवण्यात येत आहे. त्यानुसार साधारणत: 80 टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले. दुसर्‍या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाल्यानंतर आता तीसर्‍या टप्प्यात इ.पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्याचा नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. केवळ दोन महिने शाळा घेवून मे महिन्यात विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात येतील. त्यानंतर जूनमध्ये नियमितपणे शाळा सुरु करण्याचे नियोजन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर ठेवल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नेदरलँड्सचे महापौर नागपूरच्या रस्त्यांवर त्यांच्या आईचा शोध घेत आहे; ४१ वर्षांपूर्वी या घटनेने केले होते वेगळे

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, सागरी हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेत ९ क्रू मेंबर्सना अटक

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

धुळे येथे महापालिका निवडणुकीदरम्यान हिंसाचार, शिवसेना नेत्याच्या घरावर हल्ला

पुढील लेख
Show comments