rashifal-2026

राहुल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, पक्ष चालवत येत नाही ते देश काय चालवणार

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:04 IST)
भाजप सोबत सत्तेत असलेल्या एक नेत्याने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. आठवले यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हि उभे केले आहे. आठवले यांनी म्हटले की, मागची पाच वर्षे देशात उत्तम  काम केले तरी देखील काहीजणांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. तरीही देशाच्या जनतेने ठरवलं आहे की, मोदी शिवाय त्यांना दुसरा पर्याय अजूनतरी नाही. सोबतच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना आठवले म्हणतात की, जर राहुल गांधी आपलाच काँग्रेस  पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा काय चालवतील? त्यांचा यामुळे  अमेठीतून पराभव झाला.या अगोदर आठवले यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, इतर पक्षांची महायुती २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २४० ते २५० जागांवर विजयी होईल. त्यांनी हे देखील वक्तव्य केले होते. जागा वाटपावर भाजपा-शिवसेनेने छोट्या मुद्यांना सोडून दिले पाहिजे आणि आपल्या ताकदीच्या आधारे जागांचे वाटप करायला हवे व निवडणूक लढायला हवी असे म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

रशियाने युक्रेनियन शहरावर क्षेपणास्त्रे डागली पुतिन सतत नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे झेलेन्स्की म्हणाले

भारतीय महिला हॉकी संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा

राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती विशेष

Savitribai Phule Quotes in Marathi: सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

पुढील लेख
Show comments