suvichar

राहुल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, पक्ष चालवत येत नाही ते देश काय चालवणार

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:04 IST)
भाजप सोबत सत्तेत असलेल्या एक नेत्याने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. आठवले यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हि उभे केले आहे. आठवले यांनी म्हटले की, मागची पाच वर्षे देशात उत्तम  काम केले तरी देखील काहीजणांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. तरीही देशाच्या जनतेने ठरवलं आहे की, मोदी शिवाय त्यांना दुसरा पर्याय अजूनतरी नाही. सोबतच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना आठवले म्हणतात की, जर राहुल गांधी आपलाच काँग्रेस  पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा काय चालवतील? त्यांचा यामुळे  अमेठीतून पराभव झाला.या अगोदर आठवले यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, इतर पक्षांची महायुती २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २४० ते २५० जागांवर विजयी होईल. त्यांनी हे देखील वक्तव्य केले होते. जागा वाटपावर भाजपा-शिवसेनेने छोट्या मुद्यांना सोडून दिले पाहिजे आणि आपल्या ताकदीच्या आधारे जागांचे वाटप करायला हवे व निवडणूक लढायला हवी असे म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Central Railway Mega Block प्रवाशांनो, कृपया नोंद घ्या! रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

LIVE: रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

शरद पवार गटाचे नेते विकास लावंदे यांच्यावर हल्ला, शाईफेक आणि जीवे मारण्याची धमकी

डब्ल्यूएफआयने विनेश फोगटला कारणे दाखवा नोटीस बजावली

सातारा : लहान मुलाकडून चुकून सुटलेल्या हँडब्रेकमुळे टेम्पो उलटला; एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments