Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, पक्ष चालवत येत नाही ते देश काय चालवणार

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:04 IST)
भाजप सोबत सत्तेत असलेल्या एक नेत्याने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. आठवले यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हि उभे केले आहे. आठवले यांनी म्हटले की, मागची पाच वर्षे देशात उत्तम  काम केले तरी देखील काहीजणांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. तरीही देशाच्या जनतेने ठरवलं आहे की, मोदी शिवाय त्यांना दुसरा पर्याय अजूनतरी नाही. सोबतच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना आठवले म्हणतात की, जर राहुल गांधी आपलाच काँग्रेस  पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा काय चालवतील? त्यांचा यामुळे  अमेठीतून पराभव झाला.या अगोदर आठवले यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, इतर पक्षांची महायुती २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २४० ते २५० जागांवर विजयी होईल. त्यांनी हे देखील वक्तव्य केले होते. जागा वाटपावर भाजपा-शिवसेनेने छोट्या मुद्यांना सोडून दिले पाहिजे आणि आपल्या ताकदीच्या आधारे जागांचे वाटप करायला हवे व निवडणूक लढायला हवी असे म्हटले आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments