Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेशोत्सवासाठी चाकरमानी ‘वेटिंग’वर!

Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (15:14 IST)
खेड: यंदा गणेशोत्सवाची धामधूम 31 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने 28 एप्रिलपासून आरक्षणाची दारे खुली केली. आरक्षण सुरू होताच गणेशोत्सवात धावणाऱया चारही नियमित रेल्वेगाडय़ांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाले. तासन्तास तिकीट खिडक्यांवर उभे राहूनही गणेशभक्तांच्या पदरी निराशाच पडली. या चारही नियमित गाडय़ांचे प्रवासी ‘वेटिंग’वर असून त्यांच्या नजरा आता गणपती स्पेशल गाडय़ांकडे खिळल्या आहेत.
 
गणेशोत्सवात धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण खुले करताच आरक्षित तिकिटांसाठी ऑनलाईन व तिकिट खिडक्यांवरही चाकरमान्यांची झुंबड उडाली. मात्र कोकणकन्या, तुतारी, मांडवी, जनशताब्दी एक्सप्रेस या चारही गाडय़ांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने तास्नतास तिकीट खिडक्यांसमोर उभे राहणाऱया गणेशभक्तांचा हिरमोड झाला. असंख्य प्रवाशांना ‘वेटींग’वर रहावे लागले आहे. चाकरमान्यांना आता ‘गणपती विशेष’ गाडय़ांचा आधार घ्यावा लागणार आहे.
 
सर्वच स्थानकात थांबणारी पॅसेंजर सोडावी
नियमित गाडय़ांना जास्त डबे जोडणे आवश्यक आहे. विशेष गाडय़ा सोडताना संपूर्ण एसी गाडय़ा सर्वप्रथम व त्यानंतर 15 दिवसांनी सामान्य गाडय़ा जाहीर कराव्यात. आरक्षण सुरू करताना तेवढय़ाच दिवसांचा फरक असायला हवा. मुंबई-चिपळूणनंतर मुंबई-रत्नागिरी व शेवटी मुंबई-सावंतवाडी/गोवा/मंगळूरु अशा क्रमाने विशेष गाडय़ा जाहीर कराव्यात व प्रत्येकी 2 ते 4 दिवसाच्या फरकाने आरक्षण सुरू करावे. यामुळे लांबच्या गाडय़ांमध्ये जवळच्या प्रवाशांची गर्दी होणार नाही. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबणारी एखादी पॅसेंजर गाडीही सोडावी.

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments