suvichar

Rain Update :या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार

Webdunia
रविवार, 14 ऑगस्ट 2022 (10:31 IST)
सध्या राज्यात विविध भागात पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे. मुंबई हवामान केंद्राने शनिवारीही रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट जारी केला आहे.14ऑगस्ट रोजी, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या राज्यातील काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
 
राज्यात अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे 300 हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. तसेच 95 जण जखमी झाले आहेत. पुण्यात ,औरंगाबाद,नाशिक, नागपूरात ढगाळ वातावरणाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. 
 
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या  जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस या चारही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय नांदेड जिल्हामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

पुढील लेख
Show comments